छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी

थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समर्थ रामदासस्वामींप्रती असलेली भक्ती सर्वश्रुत आहे. समर्थांना महाराज किती मानत असत हे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांमधून स्पष्ट होतं. चाफळच्या मंदिरात लष्करी लोकांचा त्रास होतो म्हणून वेळोवेळी तेथील अंमलदारांना दिलेल्या आज्ञा असोत, वा वेळोवेळी करून दिलेल्या गावांच्या आणि धान्याच्या सनदा असोत. महाराजांनी समर्थांच्या संप्रदायाकडे विशेष लक्ष पुरवले होते. दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी महाराजांनी महिपतगड आणि सज्जनगड येथील किल्लेदारांना पत्र पाठवून, "समर्थ गडावर येतील, ते जितके दिवस राहतील तितके दिवस राहू द्या, जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊ द्या, त्यांची योग्य प्रकारे काळजी घ्या, त्यांना राहायला उत्तम जागा करून द्या" अशा आज्ञा दिल्या (श्री.सं.का.ले.१५ व १६). दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी दिलेल्या विस्तृत सनदेत तर महाराज समर्थांना "श्री सकळ सद्गुरुवर्य, श्री कैवल्यधाम, श्री महाराजस्वामी" असं संबोधतात (जमाव दफ्तर, पुणे पुराभिलेखागार). परंतु अचानक, ध्यानीमनी नसताना, दि. ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचं रायगडावर निधन झालं.

रायगड आणि शिवशाहिरांसोबतच्या आठवणी

२००९ सालचा ऑक्टोबर महिना मी आयुष्यात कधीच विसरू नाही शकणार.. कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, प्रत्यक्ष कवींद्र परमानंदच जणू पुनर्जन्म घेऊन शिवभारत सांगतात असा भास होतो त्या गुरुवर्य महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत रायगड अनुभवण्याचा योग्य आला. खरंतर एकूण सात दिवसांची सहल असल्याने कॉलेज बुडवून जाणं अशक्य होतं, पण तिथे काहीतरी कारणं सांगून अखेर हि संधी गमवायची नाही असं ठरवलं आणि अखेर निघालो. प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड वगैरे बघून शेवटच्या दिवशी किल्ले रायगडावर मुक्काम होणार होता. खरंतर रायगड चढायला संध्याकाळ झाली आणि सगळे जण गडावर रात्रीच्या आसपास पोहोचले. खरंतर वाटलेलं, की आता एवढ्या रात्रीचं फारतर जेवण होईल आणि सगळे झोपायला जातील, पण होळीच्या माळावर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर मात्र पुढे जे अनुभवलं ते विलक्षण होतं ! आम्ही सगळे शिवप्रभूंच्या समाधीचं दर्शन घेऊन वाडेश्वर महादेवाच्या मंदिरात बसलो. त्यानंतरच्या सुमारे दोन तासभर सुरु होतं ते शिवशाहिरांचं शिवचरित्रकथन ! बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सांगितल्या. रायगडविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यातल्या दोन दंतकथा म्हणजे सर्जा डोंबारी आणि हिरा गवळण यांची !

दक्षिणीयांचे हातून पातशाही निसटली

पुरंदरच्या तहानंतर मुघल आणि मराठे यांच्यात जवळपास चार वर्षे शांतता नांदत होती. पण इ.स. १६६९-७० च्या सुमारास औरंगजेबाच्या मनात धर्मवेडाची लाट पुन्हा उसळली आणि त्याने उत्तरेतील हिंदूंच्या श्रद्धास्थानांना हानी पोहोचवण्यास सुरुवात केली. अनेक मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदूंकडून अनेक कामे केवळ जबरदस्तीने करवण्यात येऊ लागली. निरनिराळ्या कराच्या बोज्याखाली आधीच निष्प्राण होत असतानाच हिंदूंवर जिझिया कर लादण्यात आला! पण हे सारं औरंगजेब मोठ्या गुर्मीत आणि त्याच वेळेस शांततेत करत असताना उत्तरेतील हिंदू काय करत होते? राजपूत, जाट, बुंदेले आदी सारे जण मुघलांचीच चाकरी करण्यात धन्यता मनात होते! एक केवळ शीख ते काय मुघलांना प्राणपणाने विरोध करत आले होते पण एवढ्या प्रचंड मुघलदलासमोर त्यांचा पाडाव तो काय लागावा?

गोब्राह्मणप्रतिपालक महाराज शिवछत्रपती !!

शिवाजी महाराजांच्या 'गोब्राह्मणप्रतिपालक' या बिरुदावरून कायमच वाद उत्पन्न झालेले दिसतात. अर्थात, हे वाद एकतर जातीयवादी नाहीतर राजकारणी केवळ त्यांच्या फायद्यासाठी उकरून काढत असतात हे उघड आहे. पण यामुळे, सर्वसामान्य माणसाला, ज्याला इतिहासात नेमकं काय दडलंय हे माहित नसतं तो अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणखी संभ्रमित होतो. याकरताच, शिवाजी महाराजांच्या 'गोब्राह्मणप्रतिपालना'चे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे काय आहेत ते आपण पाहूया -

पेशवे दफ्तर भाग ३ : पुणे पुराभिलेखागार

गेल्या दोन भागात आपण खुद्द पेशवेकाळात पेशव्यांचं हे प्रचंड दफ्तर कसं होतं, त्याची स्थित्यंतरं कशी झाली आणि नंतर इंग्रजी अमदानीत  कमिशन वगैरे बद्दल माहिती पाहिली. आता या शेवटच्या आणि तिसऱ्या भागात आपण सध्याचं पेशवे दफ्तर अथवा ज्याला आता पुणे पुराभिलेखागार म्हणतात ते कसं आहे ते पाहूया.

पेशवे दफ्तर भाग २ : पेशवाईच्या अस्तानंतरची व्यवस्था

शनिवारवाड्यात सुरुवातीला, थोरल्या बाजीरावांच्या काळात फड अथवा प्रशासकीय कामकाजाची एक कचेरी होती, पण तिचे स्वरूप खूपच मर्यादित होते. पण १७५० नंतर जेव्हा संपूर्ण मराठी राज्याचा प्रशासकीय कारभार जेव्हा पुण्याला हलवला गेला आणि पुणे हे संपूर्ण हिंदुस्थानातील मराठी सत्तेचे केंद्र बनले तेव्हा मात्र पूर्वीच्या 'फडा'चा विस्तार करण्याची आवश्यकता भासू लागली. आणि म्हणूनच १७५५ च्या आसपास नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या विस्तारासोबतच या प्रशासकीय कचेरीचीही अत्यंत योग्य अशी जागा नेमून व्यवस्था केली.
Older Posts Home