तंजावरच्या समर्थांच्या मठाचे अधिपती भीमस्वामी हे समर्थांच्या समकालीन होते. त्यांनी समर्थांच्या अंतःकाळचं वर्णन करणाऱ्या काही ओव्या लिहिल्या, ज्यातून समर्थांच्या मनात शेवटी काय चाललं होतं, कशा प्रकारे त्यांनी समाधी घेतली वगैरे काही गोष्टी समजून येतात. या ओव्यांमधील दुसरीच ओव्या अतिशय महत्वाची आहे ज्यात भीमस्वामी म्हणतात, "राजाशिवछत्रपती यांचं समर्थांवर अत्यंत प्रेम होतं, आणि म्हणूनच त्यांनी सज्जनगडावर समर्थांना रहायला सांगितलं". त्यानंतरही पुढच्या ओव्यांमध्ये शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून आल्यानंतर संभाजीराजांची (पन्हाळगडावरची भेट) समजूत काढून पुढे समर्थांच्या दर्शनाकरिता आले, आणि थोर समारंभ केला असाही उल्लेख आहे. एकूणच समर्थांचं अंतःकाळचं वर्णन हे असं.
ओव्यांची सुरुवात
श्री रामसमर्थ
नकल
श्री राम : समाधी समर्थाची पूर्ण : वर्णन जाले सुख
संपन्न : श्रवण करिता श्रोते जेन : पावन होती ।।१।।
राजा सिवछत्रपती : समर्थासी आती प्रीती : सज्ज
नगडी तेही वस्ती : करविली ।।२।। बहुत दिवस करून
सेवा : आला कर्नाटकी यावा : विज्यई होऊनि आपले गावा
प्रवेशेले ।।३।। शंभूराजा प्रतिष्टीला : समर्थ दर्शना
सी आला : समारंभ थोर केला यथापरंपरे ।।४।। याउपरी
रौद्र संवछरी : यात्रा चाफलीची बारी : करुनि आले
गडावरी : भक्त सर्व ।।५।। दिवाकरे नमस्कार : करिता
बोलले उतर : आदी करून वस्त्रपास्त्र : पत्री लिहिणे ।।६।।
पत्र प्रसंगानसार : राजासंनिध सत्वर : ठेऊन बोलावे
उतर रघु ******सी ।।७।। चाफलीस दीपमाला :
दोनी करावया विशाला : उलाटुनी (?) या देवालयासी
** करावे ।।८।। सिवराज्य मान्य : केले होते म्हणौनि
स्मरण : देत जातील आंत:कर्ण परी करतील तैसे ।।९।।
त्यास देव देईल बुध्धी : तैसी करतील सिध्धी : म्हणऊन सांगितले
आधी : करुणालया ।।१०।। संवत्सरी दुर्मति सज्जन
गडी होई मारती दोनी सहस्र निष्क प्रीती वेचो पाये ।।११।।
घर बांधिले विशाले ग्रहप्रवश करतीय वेले वैशाख
मासी भक्तापाले प्रवेशले ।।१२।। तेव्हा बोलले व*न आम्हास
राहणे स्वल्प जाण दाहा मास संख्या पूर्ण तेव्हा केली ।।१३।।
माघ व।।९ जाणे आहे परंधामी केला निश्चय आंतर
यामी भावे याईसा ।।१४।। याउपरी बाहेर येणे न घडे बहुत
बोलणे श्रीचे कार्य श्रीस्मरणे करीत जावे ।।१५।। बुध्धी
देईल रघुनाथ तैसी वर्तणूक सत्य करणे हे हो श्रुत
न करी कोण्हा ।।१६।। घरच्या उतरभागी थोर देवालय
ते सुंदर करून प्रतिष्टा रघुवीर प्रेमे पुजा ।।१७।।
यैसे ****** समाप्ती उपरी जाली मार्गसीर्ष
मासी वोली लिहिल्या तेथे ।।१८।। आपणामागे भगवंतासी
भज्यत जावे निश्चयासी हेचि मागणे सिषासी आणिक
नाही ।।१९।। ऐसे सांगितले सर्वाला वस्त्रे दिधली सकला
ला मग आपण हो लोक वस्त्र त्याग ।।२०।। मधे ग्रही केले राहणे
नावडे मनुष येणे जाणे पलंगावरी उतणे तेथील मग ।।२१।।
आन्नपाणी दोन्ही नाही अखंड समाध्धिस्त पाही भक्त
जने लवलाही विनविती ।।२२।। वेथा स्वामी आंगी नस
ता बैस* जाली आतिक्षीणता बहूतावरी दया आ
ता श्रीची व्हावी ।।२३।। हा पर्वत सीतल येथे राहून य
*पलगडाखाली सुस्तल केले आहे ।।२४।। आथवा चाफलासी
जावे परी येस्थली नसावे कृपाळुवे आम्हा भावे थोर कीजे ।।२५।।
तेव्हा बोलिले उतर नलगे उपाधी शरीर खाली उतरता
स्थिर देह नव्हे ।।२६।। जेथे होईल हे प्रांत तेथे भज्यतील
हो भक्त उछाह चाफली आद्भुत राहील तेव्हा ।।२७।।
म्हणौन सज्यनगडी वास आम्हा करणे सावकास जे होईल दे
हास ते घडे येथे ।।२८।। अनेक वचने समईची सांगितली
नानापरीची रघुनारायण त्याची जाली सय ।।२९।। पूर्वी चा
फली येऊनि मागितले श्रीलागोनी सिध्ध जालियावरी
स्मरण नाही त्यास ।।३०।। त्यासी येकवेल लिहिणे
घडले तेच हो कर्णे ऐसे आज्ञापिले वचन करुणालय ।।३१।। मम्बा
र निबदेव (?) भक्त समर्थ चरणी हो चित ठेऊन परतली
त स्वस्थ आसती भावे ।।३२।। तेही चवदा मणाच्या मू
र्ती लक्ष्मण सीता मारुती आणि चवथा दाशरथी राम
चेंन्द्र ।।३३।। केल्या सत्वर पाठविल्या केशव निस्प्रही आणि
ल्या माघ व।। ५ आल्या मोहछाया ।।३४।। मध्ये रात्रीस
साहवे तासी समर्थ पाहती त्या मूर्तीसी मेण होते ते न
यनासी ते काढविले ।।३५।। श्रीचे मुखावलोकन केले
परम समाधान जाले याउपरी आपले राहणे न घडे ।।३६।।
आवकाश पाच दिवस उरला आहे आम्हास कोण पूजिल ते
त्यास यष घडो ।।३७।। करणाराच्या करविल्याच्या आणि
ल्याच्या श्रमाचा प्रसाद जाला सर्वाचा मनोरथ ।।३८।।
माघ व।।९ दिवसा दोन प्रहर नेमी शनवारी परधामी
योग केला ।।३९।। पलंगाखाली उतरले पादुका पाई ले
ईले उतर दिसेकडे केले मुख बरवे ।।४०।। भक्तजेन विनवी
ती पलगावरी बैसावे म्हणती तेव्हा बोलले हे प्रीती
बैसणे नाही ।।४१।। तुम्ही बैसवाल तरी पाहा म्हणौन उचलि
ती जाण दाह शक्तवंत करती आहनुचलती आ*ते ।।४२।।
करीता बहुतची यत्न जुपले आनुमात्र आसन ते
व्हा आज्ञापिले वचेन बाहेर बैसा ।।४३।। कोण्ही विचार पु
सिला काही आम्ही पूर्वीच सांगितले पाही सांगावया
आता काही उरेचना न न माझी काया आणि वाणी
गेली म्हणाल अंतःकर्णी परी मी आहे जगजीवनी निरंतर ।।४५।।
आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिध्ध आसता
न करावा हा खेद भक्तज्यनी ।।४६।। तीन वेला स्म
रण केले आंबर आवघे गर्जिनले रामनामे कोंदाटीले
जिकडे तिकडे ।।४७।। मुहूर्त यक हो गर्जना गगनी
कोंदाटीले हो जाणा विस्मय पावलोनि जना प्रेम आले ।।४८।।
ध्वनी जाली सवपुर्ण जाहला आवतार हो पूर्ण देशो
देशी भक्तजन जाते जाले ।।४९।। स्थल महिमा आपार
उदंड जाले साक्षातकार भीम ध्यातो निरंतर चेर
णरज्य ।।५०।। येणे प्रो। जुने प्रती वरून लिहिले असे
ओव्यांचा शेवट
टीप: भीमस्वामींनी लिहिलेल्या मूळ कागदाची हि नंतर केलेली नक्कल असून त्यावर स्पष्ट नकल असं लिहिलं आहे. हा कागद धुळ्याच्या राजवाडे मंडळाच्या संग्रही असून सेतुमाधवराव पगडींसह अनेकांनी पूर्वी वाचला होता.
- © कौस्तुभ कस्तुरे